काॅलेजनंतर जेव्हा मी नवीन जाॅब जाॅईन केला; तेव्हा माझे जे बाॅस होते त्यांनी मला दोन गोष्टी समजवल्या होत्या. खुपच सोप्या गोष्टीहोत्या. पण मला त्या नेहमी उपयोगी पडल्या.
नवीन जाॅब होता. तेव्हा मी आणि माझे मित्र सर्व नवे होतो. माझे बाॅस खुपच स्ट्रिक्ट होते. कधी कोणी चुक करत असे, तर ते खुपरागावत. आम्ही सगळे त्यांना घाबरायचो. जसा काळ गेला तसा त्यांची भीती थोडी कमी झाली.
एकदा लंच टाईममध्ये आम्ही नेहमी प्रमाणे एकत्र जेवायला बसलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितले,” हे नेहमी लक्षात ठेव, कधीही कोणाचीचुक असेल, तर त्या व्यक्तीशी फक्त त्या चुकीबद्दलच बोलायचं. त्याला असं नाही म्हणायचं की तू नेहमी असच करतो, तुझी ही गोष्टमला आवडत नाही, तुझी ती सवय चुकीची आहे. फक्त आणि फक्त त्या चुकीबद्दलच बोलायचे.” रागात आपण काय काय बोलतो? अशाही गोष्टी बोलतो ज्यांचा त्या चुकीशी काहीही संबंध नसतो.
दुसरी गोष्ट मी बघितली होती, ते कितीही वेळा कोणावर रागावत असतील पण कधीही त्यांनी कोणाचा रिपोर्ट खराब नाही लिहिला. त्याबद्दल मी एकदा त्यांना विचारले.
ते बोलले,” बघ, तू कोणाशी रागाने बोललास, चुकून काही चुकीचं बोललास; तो व्यक्ती काही दिवसांनी ते विसरून जाईल. पण जेव्हातू कोणाचं कागदावर नुकसान करतोस, तर ते तू कधी बदलू शकत नाही. तू कागदावर केलेलं नुकसान त्या व्यक्तिला नेहमी त्रास देतराहते.”
आज ते रिटायरमेंटचं आरामदायक जीवन जगत आहेत. आजही त्यांना भेटायला जातो तेव्हा त्यांनी शिकवलेल्या या गोष्टी आठवतात.
आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
https://www.facebook.com/pramodplanet/
#simple #pramodwaghmare
https://youtube.com/channel/UC6D3rune6wO6GQV9QMLT-vg
(C) Pramod Waghmare