Monday, October 14, 2019

माणूस किती काळ टिकेल?

माझी मुलगी आणि तिच्या मैत्रीणीचं जोरात डिस्कशन चाललं होतं.

मला बघून तिची मैत्रिण म्हणाली, “ अंकल, माणूस किती काळ टिकू शकेल?”

मी: “काय झालं मुलांनो?”

मैत्रिण: “आता पृथ्वीचं टेम्परेचर २ डिग्री ने वाढतंय.”

मी: “मग?”

मुलगी: “आर्टिक्टचा बर्फ वितळतोय.”

मी: “ओके.”

मैत्रिण: “समुद्राची पातळी वाढतेय. पोलर बेअर आणि कितीतरी पशुपक्ष्यांसाठी धोकादायक परिस्थिती आहे.”

मी: “बरं.”

मुलगी: “ दिल्लीत स्वच्छ हवेसाठी एअर प्युरिफायर वापरावे लागत आहेत.”

मैत्रिण: “तेच तर. जर टेम्परेचर ५५-६० डिग्री झालं आणि पृथ्वीवरचं प्रदूषण असंच वाढत राहीलं, तर माणूस टिकू शकेल का?”

मी: “खरी गोष्ट आहे मुलांनो. महाकाय डायनासोर नामशेष झाले, कितीतरी पशुपक्षी आता दिसतही नाहीत. खरोखरच या बदलत्या वातावरणात माणुस टिकू शकेल का?”

प्रमोद वाघमारे

https://pramodplanet.blogspot.com/

#pramodplanet #growforests

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...