आरामात पुस्तक वाचत होतो. तेवढ्यात माझी मुलं काॅलेजची ॲानलाईन लेक्चर्स पूर्ण करून माझ्या जवळ आली.
“आपण हे लाॅकडाऊन दर वर्षी करू शकू का?” माझ्या मुलीचा प्रश्न.
“हे आपण करू शकत नाही.” मी बोललो.
“का नाही? प्रदुषण किती कमी झालंय. एवढी स्वच्छ हवा, एवढं शुद्ध पाणी.” मुलगा बोलला.
“सर्व इंडस्ट्रीज बंद पडतील. जगाची अर्थव्यवस्था बिघडून जाईल. हे शक्य नाही.” मी बोललो.
“जर आपण दर वर्षी फक्त एक आठवडा साऱ्या जगात लाॅकडाऊन करू शकलो तर?” मुलगी बोलली.
“सर्व जग एक आठवडा बंद?” मी विचारलं.
“आपण एक वर्ष आधीच पुढच्या वर्षाचा लाॅकडाऊनचा एक आठवडा डिसाईड करायचा. ज्यावेळी सर्व काही बंद राहील. सर्व जणमिळून तो आठवडा ठरवतील ज्यामुळे सण आणि सर्व गोष्टींचा विचार करून प्लॅनिंग करू शकू.” मुलगा बोलला.
“ओके, मग?”
“त्यामुळे सर्व इंडस्ट्रीज शाळा काॅलेजेस आधीच आपल्या कामांचे प्लॅनिंग करू शकतील. अत्यावश्यक सेवासुद्धा प्लॅन करता येतील. कोणतीही कंपनी चालणार नाही, कोणती गाडी सुद्धा रस्त्यावर येणार नाही.” मुलगी बोलली.
“मग तर सगळे सुट्टी समजून फिरायला जातील.” मी.
“टूरिस्ट जागांवरही कोणतीच गाडी चालणार नाही. तुम्हाला तिथे पण हाॅटेलमध्येच रहावं लागेल. हो पण पायी तुम्ही कुठेही फिरूशकाल.” मुलगा बोलला.
मुलांच्या बोलण्यात खरेपणा तर होताच.
“प्रामाणिकपणे आणि विश्वासाने केलं तर हे शक्य होऊ शकतं. आपण भारतीय याचा प्रारंभ करू शकतो आणि जगासमोर एक चांगलंउदाहरण ठेऊ शकतो.” मी बोललो.
आपके अभिप्राय ज़रूर लिखें 🙏🙏🙏
प्रमोद वाघमारे Pramod Waghmare
#pramodplanet #pramodwaghmare